Bhavpurna Shradhanjali Message in Marathi:- Shradhanjali Message In Marathi, Bhavpurna Shradhanjali In Marathi,Bhavpurna Shradhanjali Marathi Status
Bhavpurna Shradhanjali Message in Marathi
सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही.. पण हे कोणालाच कसे समजत नाही की, लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. पण तरीदेखील मन तुझ्या जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
तो हसरा चेहरा,
नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!
कष्टाने संसार थाटला पण
राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.
भावपूर्ण श्रद्धांजली!
आपल्या वडिलांना देवाज्ञा
झाली ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली|
आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली,
आत्म्यास चिरशांती लाभो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
ज्योत अनंतात विलीन झाली,
स्मृती आठवणींना दाटून आली,
भाव सुमनांची ओंजळ भरुनी,
वाहतो आम्ही श्रद्धांजली.
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ, माया, प्रीती देवूनी सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहला तुम्ही जीवनी
मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे
हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते
देवाला प्रार्थना आहे की त्यांना मोक्ष प्रदान करा
लोक म्हणतात की,” एक जन गेल्याने दुनिया संपत नाही किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाख लोक मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली
आई बाबांचा लाडका तु,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
परत येरे माझ्या सोन्या,
तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.
भावपूर्ण श्रद्धांजली!
जड अंतःकरणाने,
मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी प्रार्थना करतो.”
जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग आई मी तुला कसे विसरू. भावपूर्ण श्रद्धांजली
आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही.. याचे दु:ख होत आहे. पण तू जिथे असशील तिथे माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली